जळगावात आज राष्ट्रीय लोक अदालत; वर्षानुवर्षे रखडलेले वाद मिटवण्याची सुवर्णसंधी

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी) : न्यायालयीन प्रक्रियेत वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यांना सामोपचाराने पूर्णविराम देण्यासाठी आज, शनिवार (दि. ९ मे २०२६) रोजी जळगाव येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात हा उपक्रम होत असून, मोठ्या संख्येने प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित या लोक अदालतीचे अध्यक्षस्थान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी भूषविणार आहेत. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा वकील संघ, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका प्रशासन यांचे सहकार्य लाभत आहे.

या लोक अदालतीत मोटार वाहन ट्रॅफिक चलन, चेक बाऊन्स, वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, भूसंपादन, दिवाणी तसेच तडजोडयोग्य फौजदारी प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यांसोबतच दाखलपूर्व प्रकरणेही सामोपचाराने निकाली काढण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे राष्ट्रीयकृत बँका, वित्तीय संस्था, मोबाईल व दूरसंचार कंपन्यांकडून थकीत रकमेवर सवलती देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे कमी खर्चात, कमी वेळेत आणि परस्पर सहमतीने वाद मिटवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

ज्या पक्षकारांना आपले प्रकरण तडजोडीद्वारे निकाली काढायचे आहे, त्यांनी आपल्या वकिलांसह लोक अदालतीत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. तसेच ऐनवेळीही तडजोडीसाठी प्रकरणे सादर करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.जळगाव(प्रतिनिधी) : न्यायालयीन प्रक्रियेत वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यांना सामोपचाराने पूर्णविराम देण्यासाठी आज, शनिवार (दि. ९ मे २०२६) रोजी जळगाव येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात हा उपक्रम होत असून, मोठ्या संख्येने प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित या लोक अदालतीचे अध्यक्षस्थान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी भूषविणार आहेत. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा वकील संघ, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका प्रशासन यांचे सहकार्य लाभत आहे.
या लोक अदालतीत मोटार वाहन ट्रॅफिक चलन, चेक बाऊन्स, वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, भूसंपादन, दिवाणी तसेच तडजोडयोग्य फौजदारी प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यांसोबतच दाखलपूर्व प्रकरणेही सामोपचाराने निकाली काढण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे राष्ट्रीयकृत बँका, वित्तीय संस्था, मोबाईल व दूरसंचार कंपन्यांकडून थकीत रकमेवर सवलती देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे कमी खर्चात, कमी वेळेत आणि परस्पर सहमतीने वाद मिटवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
ज्या पक्षकारांना आपले प्रकरण तडजोडीद्वारे निकाली काढायचे आहे, त्यांनी आपल्या वकिलांसह लोक अदालतीत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. तसेच ऐनवेळीही तडजोडीसाठी प्रकरणे सादर करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest