जळगाव (प्रतिनिधी: संभाजी नाल्कोल) शहरामध्ये
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बस भररस्त्यात अचानक थांबल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना समोर आली आहे. बस रस्त्यावर थांबल्यानंतर प्रवाशांना रस्त्यावरच उतरावे लागल्याचे दिसून आले.

भरधाव वाहतुकीच्या मार्गावर बस थांबल्यामुळे इतर वाहनांची मोठी कोंडी झाली. परिणामी वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागला. काही काळ वाहतुकीचा वेग मंदावल्याने नागरिकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागला.

अशा प्रकारे रस्त्यावरच बस थांबल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
वाहतुकीचे नियम व रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अशा घटनांकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.








