रावेर पोलिसांकडून पुरग्रस्तांना मदतीचा हात; अहीरवाडीत 150 ग्रामस्थांना अन्न वाटप

Spread the love

रावेर(प्रतिनिधी):दि. 28 जून : रावेर तालुक्यात 24 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अहीरवाडी गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. नाल्याकाठी राहणाऱ्या अनेक ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

पूरस्थितीनंतर रावेर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुरग्रस्त ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आवश्यक मदतीचे आश्वासन दिले.

या पार्श्वभूमीवर रविवारी (28 जून) रावेर पोलीस स्टेशनच्या वतीने अहीरवाडी येथे सुमारे 140 ते 150 पुरग्रस्त ग्रामस्थांना जेवणाचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस हवालदार सुनील वंजारी आणि पोलीस शिपाई तथागत सपकाळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

हा उपक्रम जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मदतकार्याबद्दल पुरग्रस्त ग्रामस्थांनी रावेर पोलिसांचे आभार व्यक्त करत समाधान व्यक्त केले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest