गांधी चौक पोलिसांची मोठी कामगिरी : हरवलेले 10 मोबाईल शोधून मालकांना केले परत

Spread the love

लातूर(प्रतिनिधी ):दि. 8 जून : नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून त्यांना परत देण्याची उल्लेखनीय कामगिरी गांधी चौक पोलीस ठाण्याने केली आहे. पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने तांत्रिक तपासाच्या मदतीने एकूण 10 हरवलेले मोबाईल शोधून संबंधित मालकांच्या ताब्यात दिले.

गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानक, गंजगोलाई, मार्केट यार्ड, कापड लाईन, सराफ लाईन आदी परिसरातून मोबाईल हरवल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोधमोहीम राबविण्यात आली.

गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. पथकातील पोलीस अंमलदार योगेश चिचोलीकर यांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास करून हरवलेले मोबाईल शोधून काढले.

या कारवाईदरम्यान सुमारे 2 लाख रुपये किमतीचे 10 मोबाईल हस्तगत करण्यात आले. आवश्यक पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे मोबाईल संबंधित मालकांना परत करण्यात आले.

हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी गांधी चौक पोलिसांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. पोलिसांच्या तत्परतेचे, जनसेवेप्रती असलेल्या बांधिलकीचे आणि तांत्रिक कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने कार्यरत असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest