व्यसनाला नकार, जीवनाचा स्वीकार; विद्यार्थ्यांचा नशामुक्त भारताचा संकल्प

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरून येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे आरोग्य व कल्याण समितीच्या वतीने “व्यसन विरुद्ध जीवन” हा नाविन्यपूर्ण जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देत नशामुक्त भारत घडविण्याचा संकल्प केला.

उपक्रमात विद्यार्थ्यांसमोर “व्यसन” आणि “जीवन” या दोन संकल्पनांचे प्रतीकात्मक सादरीकरण करण्यात आले. व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम तसेच निरोगी, आनंदी आणि यशस्वी जीवनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने “मी जीवनाची निवड करतो, व्यसनाची नाही” असा संकल्प लिहून हिरव्या जीवनवृक्षावर चिकटवला. तसेच “व्यसनाला नकार – जीवनाचा स्वीकार” आणि “नशामुक्त भारत – विकसित भारत” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त भारतासाठी शपथ घेतली.

 

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण झाली. हा संदेश आपल्या कुटुंबापर्यंत व समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धारही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

 

मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहून निरोगी, सुदृढ आणि जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले. आरोग्य व कल्याण समितीच्या प्रमुख उज्ज्वला नन्नवरे यांनी उपक्रमाचे नियोजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच रूपाली आव्हाड यांनी व्यसनमुक्तीबाबत प्रभावी समुपदेशन करून व्यसनाचे दुष्परिणाम आणि निरोगी जीवनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

 

शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

नाडगावातील देशी दारू दुकान फोडले; ३९ हजारांचा मद्यसाठा लंपास

बोदवड(प्रतिनिधी ):तालुक्यातील नाडगाव येथे अज्ञात चोरट्यांनी सरकारी मान्यताप्राप्त देशी दारू दुकानाचे शटर वाकवून सुमारे ३९ हजार रुपयांचा मद्यसाठा चोरून नेल्याची घटना समोर आली आहे....

24 तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघड; तीन आरोपी जेरबंद,...

नांदेड(प्रतिनिधी )विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासांत छडा लावत विमानतळ गुन्हे शोध पथकाने तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून...

जळगावात ३ दिवस वाहतुकीत मोठा बदल; रेल्वे ब्रिज दुरुस्तीमुळे...

जळगाव(प्रतिनिधी ): अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रेल्वे पुलांच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिस प्रशासनाने वाहतुकीत तात्पुरता बदल केला असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन...

संपादक - रजत शेख

Latest