Home जळगांव जळगाव शहरात रिक्षांमधून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; पालकांमध्ये चिंता

जळगाव शहरात रिक्षांमधून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; पालकांमध्ये चिंता

0
जळगाव शहरात रिक्षांमधून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; पालकांमध्ये चिंता
Oplus_131072

जळगाव (प्रतिनिधी ):शहरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांमधून सुरू असलेला धोकादायक प्रवास पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक ठिकाणी रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसवले जात असल्याचे चित्र दिसून येत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळी आणि दुपारच्या वेळेत शाळा सुटताना रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षांमध्ये गर्दीचे प्रमाण वाढलेले दिसते. काही रिक्षांमध्ये लहान विद्यार्थ्यांना उभे राहून प्रवास करावा लागत असल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. यामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी वाहतूक विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच शाळा प्रशासनानेही विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी तपासणी मोहीम राबवली जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अधिक कडक अंमलबजावणीची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता पालक, शाळा प्रशासन आणि वाहतूक विभाग यांनी समन्वय साधून योग्य पावले उचलणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.